Monday, November 8, 2010

प्रेमाचा ढंग बदलला आहे 
प्रेमाचा गंध हरवला आहे 
पण प्रेम पत्रांचा रंग मात्र अजून तसाच आहे

तुही बदलली आहेस
अन मी पण बदललो आहे
पण आठवणीतला गाव अजून तसाच आहे

जगायची रितच आता वेगळी
रक्ताची नाती पण बदलली  
पण रक्ताचा रंग मात्र अजून तसाच आहे

ऋतू आले अन ऋतू गेले 
काहींनी आयुष्य माझे सजवले काहींनी उसवले 
पण कविता करायचा माझा छंद अजून तसाच आहे

पाउस येईल अन पाउस जाईल 
तुझी आठवण येईल न येईल
पण पावसाचा अन माझा याराना अजून तसाच आहे

पाउस येतो वेळी अवेळी,
थंडीही लपली कुठे आभाळी,
पण ओल्या मातीचा सुवास मात्र अजून तसाच आहे....